शब्द फुकट भेटतात पण तुम्ही ते कसे वापरता यावरून शब्दांची आणि तुमची किंमत ठरत असते.
वेळ वाईट असेल तर मेहनत करा, वेळ चांगली असेल तर कोणाची मदत करा.
प्रत्येक व्यक्ती आपल्या जिभे मागे लपलेला असतो जर तुम्हाला त्या व्यक्तीला समजायचे असेल तर त्यांना बोलू द्या.
घट्ट पकडल्याने देखील कधीकधी नाजूक बोटे हातातुन सटकतात म्हणूनच कोणतेही नाते जोर लावून नव्हे तर प्रेम लावून धरले जाते.
जरी लोकांना वाटते की तुम्ही चांगले करावे परंतु हे देखील सत्य आहे की त्यांना असं कधी वाटत नाही की तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले करावे.
भाग्य देखील त्यांना साथ देतो जे कठीण परिस्थितीत देखील आपल्या लक्ष्यासोबत टिकून राहतात.
चूक कडुलिंबाची नाही की तो कडू आहे दोष तर जीभेचा आहे जिला गोड चव आवडते.
सर्वांना ह्याचे दुःख आहे की आयुष्यात खूप कमी भेटले आहे, परंतु जरा विचार करा, जितके तुम्हाला मिळाले आहे तितके देखील कित्येकांना मिळाले नाही.
खोटे ह्यासाठी नेहमी विकले जाते कारण खरे विकत घेण्याची लायकी सर्वांजवळ नसते.
जर तुम्ही पूर्णपणे तुटून गेल्यावरही हसू शकता तर हे नक्की आहे की जगात कधी कोणीही तुम्हाला तोडू शकत नाही.
विश्वास ठेवा, जेव्हा आपण कोणाचे चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी देखील कुठे तरी काही तरी चांगले होत असते.
खरेपणा आणि चांगले पणा यांचा शोध करण्यासाठी संपूर्ण जगात फिरून पाहा... जर तो तुमच्यातच नसेल तर तो कुठेच नाही.
कोणी सन्मान करो वा न करो, चांगले कर्म करीत रहा, कारण सूर्योदय तेव्हाही होतो जेव्हा करोडो लोक गाढ झोपेत असतात.
निंदेला घाबरून आपल्या लक्ष्यापासून भटकून जाऊ नका कारण लक्ष्य साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मते बदलून जातात.
कधी कोणाला जाणून बुजून दुखवू नका, कारण दिली गेलेली वस्तू हजार पटीने आपल्याजवळ परत येत असते.