काळासोबत चालले नाही तरी चालू शकते पण नेहमी सत्यासोबत राहायला हवे कारण सत्य तुम्हाजवळ असेल तर काळ आपोआपच तुमच्या सोबत येईल. समजावण्यापेक्षा समजून घेण्यासाठीच मोठी परीक्षा असते कारण समजावण्यासाठी अनुभव आणि ज्ञान लागते पण समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो जो सर्वांकडे नसतो. नेहमी आपल्या मनातील चांगल्या विचारांना प्रोत्साहन आणि उत्तेजन द्या कारण आपण आपल्या विचारांपेक्षा जास्त मोठे कधीही होऊ शकत नाही. जे वात बघतात त्यांना चांगल्या गोष्टी मिळतात, जास्त चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात, पण सर्वोत्कृष्ट गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात. एकदा प्रयत्न केल्यावर अपयश आल्यास थांबू नका कारण प्रयत्नांती परमेश्वर हे कोणी उगाचच म्हटलेले नाही. तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर लोक हसत नसतील तर तुमची ध्येये खूपच लहान आहेत असे समजा. आयुष्य अवघड आहे हे खरे पण ते अशक्य मुळीच नाही हे देखील तितकेच सत्य आहे. आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर नेहमी जगाचा विचार करणे सोडून द्या.